बिंदू.... रेषा आणि त्रिकोण ...........:)


वाचकांची घेऊन आलोय नवी प्रेमकथा .....
आज शुभारंभ .....
हा एक Montage !!!!
पूर्ण कथा यथावकाश प्रकाशित करतो....
कथेतील पात्र व घटना काल्पनिक असून वास्तविक त्यांचा वास्तविक जीवनाशी कुठलाही संबंध नाही हे सुज्ञ व जाणकार तसंच चाणाक्ष वाचकांना वेगळे  सांगायला  नको
"समीक्षा करावी मात्र माझ्या आयुष्याशी त्याचा संबंध लावण्याचा प्रयत्न करू नये........ "
 



तुला विसरणं शक्य नाही....आणि तू माझी होणा या जन्मात तरी शक्य नाही....
 तुला इतक्या वेळा वेगवेगळ्या मार्गांनी परावृत्त करून बघितलं  पण तुझा आपलं तेच ...... 
तुला माझं प्रेम कळलंच नाही कधी....
.....आणि आता मी हट्ट सोडला म्हणून कळणारही नाही या जन्मात तरी ....
पण खरा सांगू का तुझ्यापासून दूर जाण्यासाठी खूप अट्टाहास केला.... तुझ्याशी तोडून बोलणे हा त्यातलाच प्रकार ....
     आणि कायम त्याच विवंचनेत राहणं मला जीवघेणं वाटत होतं ...
सगळ्याच बाजूनी कोंडी झाली होती .... अगदी आत्महत्ते पर्यंत विचार करून झाले ...
नंतर माझेच जुने विचार आठवले ....
कुणाला तरी विसरायचे  म्हणजे दुसऱ्या कुणाला तरी आयुष्यात आणावे लागेल
नाहीतर आयुष्याची राखारांगोलीच !!!
प्रेम त्रिकोणात नकोच .... ते असावे सरळ रेषेवर .....
त्रिकोणाचा चौकोन पंचकोन षटकोन होऊ शकतो .... अगदी वर्तुळ सुधा होऊ शकते.... पण रेषा नाही होऊ शकत ......
त्रिकोणाची रेषा करायची  असेल तर एका बिंदुला आपलं हट्ट सोडावाच लागतो..... नाही का???
आणि मी तेच करतो आहे.. त्रिकोणाचा कोन सोडून  ........ दुसऱ्या  बिंदूच्या शोधात ... :)


थोडासा रोमांटीक हो जाये.....

रस्त्यावरले दगड सोडून कुणीही.....
रिक्षा पोस्टाची खिडकी आणि मी यात सर्वात महत्वाचे कोण आहे प्रिये????
प्रिये हे संबोधन......
तू टाचा उंच करून माझ्या शर्टाचे वरचे बटन लावावे
आणि दोरा देखील तोडावा तुझ्याच दातांनी.....
इतक्या खाजगी हक्काचे.....
कविता संदिपचीच आहे.....
मी फक्त खाजगी हक्क बदलला......
तू म्हणशील महेंद्र  शिंदे सर आणि अशी रोमान्तिक कविता........
इथे हे वाचणार्या प्रत्येकाचा मनात हाच प्रश्न आहे.........!!!!
पण आहे ते आहे.......
तू चष्म्याच्या अर्ध्या जास्ती काड्यान मधून वर
 बघत नेहमीप्रमाणे  हसत हसत म्हणशील.....
 वेडा आहे......
इथे प्रत्येक जन थोडाबहुत वेडाच आहे.....
पण तुझे वेड वेगळे....... माझे वेड वेगळे....... ;)
माझ्या या वेडाचीसुधा  जात वेगळी आहे ......
कारण मी माणूसच वेगळा आहे.....
तू घरी आलीस तेव्हा मी म्हटलो...
ते बघ ते बदामाचे झाड...
तू अगदीच अरासिकातेने  म्हटले... .. "मला माहिती आहे....."
झाड माहिती असेल ग...
पण त्या बदामाचे गुपित माहित आहे का??
...माझ्यासारखेच आहे......
त्या पानांना देखील प्रेमाची जाणीव पानगळ होताना होते......
म्हणून तर ती पिकली पाने लाल असतात आणि
प्रेमाची निशाणी देखील लाल बदाम  असते.....
..........................................................................
कसेही असले तरी मी तुझी वाट पाहीन......
अगदी वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत
तू पुन्हा खोचकपणे विचारशील.... मग काय लग्नच करणार नाहीस काय तोपर्यंत..??
हो करणार कि प्रिये....
"नालायक...".(तुझे उद्वेगपूर्ण उद्गार....!!!!)
पण तरीसुद्धा वाट तुझीच पाहीन.....
आयुष्यभर ना सही निदान आयुष्याच्या संध्याकाळी तरी तू माझ्या सोबत असशील......
...........................निदान तेव्हा तरी येशील ना?????


कधीतरी आयुष्यात .... :)


माझे तिच्यावरचे  प्रेम कृष्णाचे राधेवर होते तसे आहे
त्याला अधिकार नको....
मंगळसूत्राची सत्ता पण नको
ते अधिकार सत्ता  मिळाले तर कृष्णापेक्षा भाग्यवान असेल मी
पण हट्ट नाही कि ते हवेच म्हणून
कारण खरे प्रेम तर चंदनासारखे असते ना...
ज्याला फळे येत नाहीत तरी कृतार्थ झालेले असते 
त्याचे आयुष्य सुगंधी झालेले असते....
तशी ती  माझ्या आयुष्यात यावी
अगदी सुगंधी कुपिसारखी....
ती  दूर गेली  तरी सुगंधासारखी दरवळा वी
सोनपावलांनी लक्ष्मी घरात आली तर तिचे आनंदाने  स्वागतच होते....
तशी ती  यावी  .... मी अडवणार नाही जाताना ....
पण तिचे  येणे महत्वाचे आहे.....
कारण ती  माझ्या  कल्पनेचे वास्तव रूप आहे.....
तिच्याचसोबत तिलाच त्रयस्त ठरवून मी मोकळा झालो
तिच्यासाठी "त्रयस्त" असलेल्या  तिलाच कसे सांगू कि माझे " तुझ्यावर.. तुझ्यावर आणि ह्या सबंध जगात फक्त तुझ्यावरच मनापासून प्रेम आहे."
कधी वाटते तिला सगळे कळते.....
आणि कधी वाटते तिला कळत नाही म्हणून माझे सगळे फावते.....
असो ... कधीतरी कुठेतरी आयुष्यातल्या कातरवेळी
माझ्या छातीवर डोके ठेऊन म्हणशील.....
"कळत होते रे मला सगळे..... अगदी तुझे स्वप्न सुद्धा.....
पण शेवटी वेळ ठरलेली असते..... प्रत्येक गोष्टीची......"
आणि मी मला बिलगलेल्या  तिला अजून घट्ट कवटाळून म्हणेन
असू दे वयाच्या साठाव्या वर्षीतरी तरी तू आता फक्त ......
.......फक्त माझीच आहेस...... :)

काही नव्या चारोळ्या

 काही नव्या चारोळ्या


किती बरं झालं असतं जर 
आपल्यालाही कुणाच्या मनातलं वाचता आलं असतं 
किती बरं झालं असतं जर 
माझ्या मनातलं गुपित तुझ्यापर्यंत दरवळत आलं असतं



तू आमच्या घरात यावी
हि सर्वांची इच्छा आहे
पण तुझ्या इच्छेचा कल कळत नाही
इथेच तर मोठा लोचा आहे !!!


घरात एखादं काचेचं भांडं .... न वापरता फुटतं ....
 आपण कितीही काळजी घेतली तरी !!!
म्हणून वापरून टाकावं...... फुटण्याचा विचार न करता !!!
तसंच जगून घ्यावं हवं तसं.... कुणी काय बोलेल याचा विचार न करता !!!




जिवंतपणी का प्रेमाची किंमत कळत नाही?????

सरू म्हणजे माझ्या गावातील एक आमच्या समोरच्या खोपटात राहणारी माझ्याच वयाची...... आमच्या घरासमोरच्या अर्धवट बांधलेल्या घराच्या उरलेल्या दगडावर बसून उस खात  उसाच्या चुट्ट्या फेकत बसणारी...
स्वछंदी आनंदी.... मला तिचा फार राग यायचा.... कारण ती माझ्या प्रत्येक गोष्टीत मधे मधे करायची... आडवे तिडवे बोलायची..... दररोज यायची आणि कसल्या ना कसल्या गोळ्या मागायची.....  नेमके आई नसली कि मगच यायची..... मी कुठून हिला गोळ्या देणार??? मी तिला असेच पराचीतोमोल वगैरे देऊन कट वायचो .... ती मंद त्याच घेऊन जायची.....मला तर धड गोळ्यांची पुडी पण नित बांधता येत नसायची..... मग लगेच तिचा काहीतरी टोमणा..... हिला काय गरज आहे...... गोळ्या भेटल्या ना??? गप निघावे आपले........ पण नाही उगाच काहीतरी आपला मूर्खपणा.....
आमच्या सरांची मुलगी वैष्णवी..... खूप सुंदर दिसायची.... (खूप सुंदर दिसायची म्हणजे आवडायची असा अर्थ नेहमीच काढू नये.....) पण आम्ही बऱ्याच वेळी बरोबर असायचो...... मला तिच्यासोबत असणे चांगले वाटायचे......
सरू आम्हाला पहिले कि मुद्दाम काहीतरी मला टोचून बोलायची..... असे वाटायचे हिच्या अशी एक कानाखाली ओढावी कि आयुष्यभर आठवण ठेवील...... एकदा चिंचेच्या झाडाखालून चाललो होतो....  वैशुला चिंचा खाण्याचा मोह झाला..... मी खालीच दगड गोळा केले आणि झाडावर मारले.......पण साल्या चिवट चिंचा इकही पडेना..... वैशू  म्हटली जाऊदे....  आणि आंबट तोंड केले..... तितक्यात हे ध्यान कुठून एके आणि सरसर झाडावर चढले..... वरून गरासलेल्या चिंचांचे घोस खाली फेकले आणि ओरडली "ये मास्तरचा पोरी खा पोटभर....." मी म्हटलो "खाली उतर काना खाली जाळ काढतो तुझ्या..... " काही बोलायची पद्धत.... मास्तरची पोरगी म्हणजे काय...... काही नाव गाव आहे कि नाही..... मूर्ख आणि उद्धत कुठली.....
  आम्ही शाळेत होतो हि कधी शाळेत आलेली मला आठवली नाही...... पण मास्तर तिला पुढच्या वर्गात ढकलायचे ...... तशी ढकलगाडी ती एकटीच नवती..... खूप नमुने असे होते ज्यांना पुढे ढकलावे लागे...... कसेबसे दहावीपर्यंत पोहोचलो..... मी मनात फार आनंदी होतो कारण आता खरी लायकी कळेल असा माझा कयास होता आणि तो बऱ्याच अंशी खरा होता.......

सरूचा दहावीला इंग्रजीचा विषय राहिला..... मला मी दहावीला शाळेत पहिला आणि केंद्रात तिसरा होतो याचा जेवढा आनंद होता त्यापेक्षा सरू नापास झाली याचा आनंद जास्त होता.....  कुठेतरी मी तिला हरवलेले होते..... नाहीतर प्रत्येकवेळी ती सरस होती.... फक्त अभ्यासात ती मागे होती आणि मला ते जास्त खटकायचे....... सगळ्या बाबतीत मला चांगले म्हणावे हि अपेक्षा होती ...... आणि ती त्याला दरवेळी चेद देत होती..... आज कुठेतरी माझ्या मनाजोगे झाले होते.....  आणि तिला मी पहिला आल्याचा आनंद झाला
तिला याचा गंधही नवता..... तिची आई माझ्या आईला भेटायला आली.... निकाल विचारला..... आणि म्हटली.... माझ्या पोरीला इंग्रजी वाचता जरी आले ना तरी तुमच्यासारखे नर्सिंगला पाठविण..... औषधावरची नवे जरी वाचता आली ना तरी बरे होईल..........माझ्या आईला त्याचे फार वाईट वाटले ....... तिचे संवेदनशील  हृदय म्हटले  गरीब अशिक्षित आईची भोळीभाबडी आशा..... मी तर सातवे असमान पार होतो...... आता माझ्या लेखी तिला काडीचीही किंमत नवती....
       पुढे ११ वी बारावीला नाशिकला गेलो.....  नाशिकला गेल्यावर माझा तहात अजून वाढला...... सरूचा संबंध संपला होता...... ती आईला विचारायची अधून मधून..... मला त्याचा पण राग यायचा...... पुढे इंगीनीरीन्ग्ला अमृतावाहीनीला गेलो.... माझ्यातला शिष्टपणा कमी होत नवता..... पहिले आईचा दुपारच्या जेवणाच्या वेळी एक मजेदार नियम होता..... ती जेवायला बसली कि म्हणायची...." जा रे सरूच्या मम्मीने काय भाजी केली घेऊन ये....." मी तिच्या कोपिकडे(खोपटा कडे ) जायचो आणि तिला ऑर्डर सोडायचो.... "सरू.... आईने भाजी सांगितली....."  काकू म्हणायचा अरे ये कि घरात..... बाहेरूनच काय ओरडतो..... मला लाज वाटायची ..... त्या दळभद्री खोपटात मी कसा जाऊ,,,,, !!!!
इंगीनीरीन्ग्ला गेल्यावर मी खोपाताकडे जायचे बंदच केले..... (हमारी शान के खिलाप था वाहा जाणा....)
............................................बऱ्याच दिवसांनी आईनी फोनवर सरुचे लग्न जमल्याचे  सांगितले..... माझ्या अंगावर इकदम शिरशिरी आली .... पण इतके काही जाणवले नाही....... मनात सूक्ष्म हालचाल होत होती..... पण जाणवत नव्हती .... इंग्ग्चा हा फार मोठा तोटा आहे जाणीव बोथट होतात....
सरूचा लग्नाला विरोध होता. का कुणालाच माहित नाही....... आईने इकदिवस मरोस्तोवर मारली..... हातचे स्थळ करान्तीने घालवले म्हणून...... तिची इवढ्यात चिडचिड जास्त वाढली होती.....
एकदिवस अचानक आईचा फोन आला..... सरुने पेटून  घेतले म्हणून...... मी प्रचंड घाबरलो....... काय कारण घडले आसवे हा विचार करत होतो......  पण परीक्षा चालू होती..... आणि ती अशीपण माझ्यासाठी फार महत्वाची नवती....... कि मी परीक्षा सोडून बोंबलत तिच्याकडे जावे...... तिने पेटून  घेतले होते पण जीव वाचला होता..... फक्त अंथरून नाला खिळली होती..... मी बऱ्याच दिवसांनी घरी आलो ... आल्या आल्या आईने तिच्याकडे जायला सांगितले..... कारण ती दररोज आईला विचारायची माह्या आला का ?? म्हणून आणि आई नर्स असल्याने तिच्याकडे जावे लागे.... मला वाटले काय कटकट आहे..... पण आईने जास्त फोर्स केल्याने माझा नाईलाज झाला .... तिच्या खोपताकडे गेलो..... ती वर्षानुवर्षे चुलीच्या धुराने काळी कुट्ट झालेली झोपडीत मला जावेना.... पण मन मारून गेलो तिथे........ समोर सरू पडलेली होती...... चेहरा जास्तच विद्रूप झाला होता..... तश्या स्थितीत्पण तिच्या चेहऱ्यावर समर्पक भाव झळकले...... मी बाजूच्या सतरंजीवर बसलो .... कधी उठून जातो अशे झाले होते..... तेवढ्यात क्षीण आवाजात ती म्हटली तेवढ्या गोळ्या देतोस का??/ म्हणून इक पिवळ्या डब्ब्याकडे बोट दाखवले........ चुलीच्या धुराने पिवळा झाला असावा बहुतेक...... मी डब्बा उधडला त्यात अनेक छोट्या छोट्या पुड्या बांधलेल्या होत्या..... मी म्हटलो कुठली देऊ????? ती म्हणाली कुठली पण दे...... मला जरासे विचित्रच वाटले पण काढल्या दोन गोळ्या...... ती हसली...... का माहित नाही..... मी दोन गोळ्या उंचावरूनच तिच्या हातावर सोडल्या...... त्या जळलेल्या हातांचा मला स्पर्श मला नकोसा होता !!! तिचा चेहरा क्षणात काळवंडला...... मी मात्र निखर ट होतो..... तिचा निरोप घेतला.... आणि कॉल्लेगेला निघून गेलो...... नंतर मला आठवणीत आले त्या पिवळ्या डब्ब्यात...मीच चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या गोळ्यांच्या पुड्या होत्या....
तिने इतके दिवस  जपल्या होत्या.... आणि त्या Expiry date   संपलेल्या गोळ्या खाऊन तिने स्वताला संपवले.......

हि झाली काल्पनिक कथा पण....
आयुष्यात जगताना कधी आपण सरू असतो तर कधी माह्या...... खर प्रेम कळण्यासाठी सरूला किवा मह्याला  जग सोडावेच लागते का?????? जिवंतपणी का त्यांच्या प्रेमाची किंमत कळत नाही?????

एक होती / आहे / असेल कल्याणी......

एक होता चिमना आणि एक होती चिमणी
चिमणी मोठी रुबाबदार आणि चिमना अगदीच सुमार
तरीही एकमेकांचे जिवलग यार.
वेळात वेळ काढून एकमेकांशी बोलायचे,
एकमेकांना चिडवायचे आणि खूप खूप हसायचे .
चिमण्याच्या मनात एक खुलत होते गुपित,
चिमणी बद्दलचे प्रेम त्याच्या मनाच्या कुपीत
रोज रोज करे देवाकडे प्रार्थना ,
ही तिच्या मनात असू देत अशाच काहीशा भावना
एक दिवस धीर करून त्याने सगळे सांगितले
पण त्याला तिने अगदी सहज नाकारले
तिला म्हणे असे काहीच वाटत नव्हते,
तिच्या डोळ्यात प्रेम आहे हे अगदी झूठ होते
का “नाही” ह्याची बरीच कारणे सांगितली
पण चिमण्याच्या मनाला ती अजिबात नाही पटली
चिमना तशीच घरी गेली, तिकडे जाऊन खूप रडला
काय करावे कळेना,रडू त्याचाने आवरेना
चिमण्याला एक उपाय सुचला , त्याने चिमणीशी अबोला धरला
चिमणीला मात्र ह्याचा सुधा काहीच फरक नाही पडला
चिमणी अगदीच खुशीत होती , नवीन स्वप्ने पाहत होती
कदाचित ती थोडा जास्तच प्रक्टीकॅल होती
चिमण्याने सुद्धा आता हसत जगायचे ठरवले
पण एकांतातले अश्रू त्याला कधीच नाही आवरले
एकतर्फी असले तरी चीमन्याचे चिमणीवर अगदी खरे प्रेम होते
पण कदाचित खरे प्रेम चिमणीच्या नशिबी नव्हते
एक प्रश्न मात्र त्याला आयुष्यभर सतावत राहिला
चिमणीच्या डोळ्यात त्याला दिसलेले प्रेम हा नुसता "आभास" कसा ठरला?